spot_img
spot_img
spot_img

आंबेडकरी चळवळितील प्रत्येक कुटूंबातील एका व्यक्तीने समता सैनिक दलाचा जवान म्हणून काम करणे काळीची गरज आहे : अरुण लोखंडे 

जळकोट (अरुण लोखंडे ) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतिय बौद्ध महासभा, आर पीआय,व समता सैनिक दल या तीन शाखाचे जतन आणि संर्वधन करणे ही आजच्या तरुण पिढीची जबाबदारी आहे . प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्यानी समता सैनिक दलाचा जवान म्हणून काम करणे ही काळाची गरज आहे.कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या समाजाच्या रक्षणासाठी म्हणुन १३ मार्च १९२७ साली समता सैनिक दलाची स्थापना केली असून यामध्ये जास्तीत जास्त युवक युवतीनी आपला सहभाग नोंदवला पाहिजे असे मत पत्रकार अरुण लोखंडे यांनी जळकोट ता. तुळजापूर येथे बोलताना व्यक्त केले .

 

 

या बाबत सविस्तर वृत्त असे की जळकोट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समीती व युगपुरुष तरुण मंडळाच्या वतीने समता सैनिक दलाचा ९८वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमांच्या सुरुवातीस कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिमन्यू लोखंडे व परमेश्वर लोखंडे तुकाराम लोखंडे यांच्या हस्ते 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलीत करून पुजन करण्यात आले .

त्यानंतर समता सैनिक दलाचे जवान यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सलामी देवून मानवंदना दिली. यावेळी सामुहिक त्रिशरण पंचशिल घेण्यात आले.त्यानंतर समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून केशेगाव ता. तुळजापूर येथील समता सैनिक दलाचे भिमसैनिक शरद भिमराव बागडे डिव्हिजन ऑफीसर व गौतम मुकिंद कांबळे डिव्हीजन ऑफीसर तसेच विश्वास विजयकुमार बागडे युनिट लिडर समता सैनिक दल यांचा पुष्पहार पुष्प गुच्छ व पंचशिल पंचा देवून सन्मान करण्यात आला .

पुढे बोलताना अरुण लोखंडे म्हणाले की,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तुमच्या आमच्यासाठी बावन्नकशी सोन्यासारखा बौद्ध धम्म दिला आहे.त्यामध्ये कुठलाही खुळचट विचारधारेला स्थान नाही . विज्ञानवादी धम्म तुम्हा आम्हाला दिलेला असुन त्यांचे आपण कोटेकोर पणे पालन करून आपली भावी पिढी घडविण्याचे काम करून डॉ. बाबासाहेब आंबेकराना अभिप्रेत असलेला समाज घडविण्याचे कार्य आपण सर्वांनी मिळून करणे ही काळाची गरज आहे. 

 या प्रसंगी सुनिल माने,प्रदिप लोखंडे,सन्नी गायकवाड,कुशिंदर लोखंडे,बिबीसेन लोखंडे,रोहीत माने,सपन्या लोखंडे,युवराज लोखंडे,सुमंत लोखंडे,पाडूरंग लोखंडे,दिनकर कांबळे,ओम भोलेराव,मलिनाथ माने अविनाश लोखंडे,सौ.ज्योती लोखंडे,सुप्रीया लोखंडे,नगिना लोखंडे,सपना गायकवाड,कोमल माने,प्रज्ञा माने,जयश्री लोखंडे,सुशिलाबाई लोखंडे,लता माने,वैजंता माने, सोनल भालेराव,सारीका भालेराव,हिराबाई लोखंडे,बबीता लोखंडे,राधिका लोखंडे,सुमन लोखंडे,गोर्कना लोखंडे,लक्ष्मी लोखंडे,मनिषा गायकवाड,मंगल गायकवाड,जया माने,कस्तुरा लोखंडे,जिजाबाई लोखंडे,स्नेहा माने,वैष्णवी गायडवाड,प्रिति माने,असावरी लोखंडे,देवयानी लोखंडे,पृथ्वी बनसोडे,सानिका माने,अदिती माने,अस्मीता लोखंडे,सोनाली लोखंडे सह भिमनगर मधील शालेय मुले मुली बौद्द उपासक उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन सतिश माने यांनी केले.शरणतय गाथा घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Related Articles

ताज्या बातम्या