नळदुर्ग प्रतिनिधी .
या निवेदनात उझबेगी परकीय आक्रमक बाबर याचा वंशज क्रूरकर्माऔरंगजेब याची कबर छ. संभाजी महाराज नगर या शहरात आहे. वास्तविक, औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काढून ते छ. संभाजीनगर येथे पुरले व त्याठिकाणी त्याची कबर करण्यात आली.
याच औरंग्याने शिख गुरु तेगबहादूर यांची क्रूर हत्या केली. शिख गुरु गोविंदसिंह यांच्या दोन बाल साहेबजाद्यांना ते केवळ मुस्लिम होत नाहीत म्हणून त्यांना भिंतीत जिवंतपणी चिणून मारण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर त्याचे वर्णन करता येणार नाही अशी भयंकर यातनामय हत्या याने केली. श्री. काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले, मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिरांचा यानेच विध्वंस केला. सोरटी सोमनाथाचे मंदिर पुन्हा एकदा यानेच फोडले त्र्यंबकेश्वर मंदिर, जेजुरी गड यावर हल्ले केले. हजारो हिंदुंच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक क्रूर कत्तल केली. छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वेळा धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हिंदूंचे मोठ्या
प्रमाणावर धर्मातरण केले.
अश्या क्रूरकर्माव आतातायी औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर हि पुर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचेच, अनंत यातनांचे प्रतिक आहे. आम्ही सर्वआपणांस विनंती करतो की, आपण हि कबर पुर्णपणे नष्ट करावी. परकीयांचे कुठलेही नामोनिशाण हे नष्ट झाले पाहिजे. तरी आपण योग्य पद्धतीने हि कबर पुर्णपणे काढून टाकावी. व है न झाल्यास पूर्वसुचित करून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हिंदू समाजा बरोबर
छ. संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कूच करतील व औरंग्याची कबर ध्वस्त करतील अशी मागणी अप्पर तहसील कार्यालय मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवेदन करण्यात आलेले आहे.
यावेळी राजकुमार गाढवे, अजय दासकर,अंकुश चीनकरे , आकाश आळंगे, चेतन कस्तुरे , ओंकार करपे, हर्षवर्धन पाटील, सिदराम जमादार, रितेश जमादार, शुभम गाढवे, आप्पास गिराम हे उपस्थित होते.