spot_img
spot_img
spot_img

जळकोट भिमनगर मधील युवकांनी श्रमदान करून पुतळा परिसराची केली स्वच्छता 

जळकोट (अरुण लोखंडे ) :- तुळजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचयात म्हणुन जळकोट ग्रामपंचायत कडे पाहीले जाते पण नाव मोठ आणि लक्षण खोट म्हणण्याची वेळ भिमनगरवर आल्याचे चित्र दिसत आहे .

जळकोट ग्रामपंचायतीचे भिमनगरच्या विकासकामाकडे कायम दर्लक्ष

याबाबत प्राप्त माहिती अशी की जळकोट भिमनगर मधील भौतीक सुविधा पुरण्यास ग्रामपंचायत जाणिव पूर्वक दुर्लक्ष करित असुन येथील संपूर्ण गटारी तुंबलेले असुन मच्छरचे प्रमाण वाढले आहे येथील लहान बालकांना व जेष्ठ नागरीक माता भगिणीना याचा खूप त्रास होत आहे गटारी तुंबल्याने दुर्गधी वास येत आहे अंगणवाडी ज्या ठिकाणी भरते त्या ठिकाणी ची गटार पूर्णताहा तुंबली असुन येथील लहान बालकांना याचा खूप त्रास होत आहे त्याच ठिकाणी त्याना सकस आहार खाण्यासाठी दिलो जातो . गेली दोन तीन वर्षात एखादाही ग्रामपंचायतने भिमनगर मधील गटारी काढल्या नाहीत की स्वच्छता केली नाही नाविलाज आणि ग्रामपंचायतीची उदासिनता म्हणुन येथील तरुणांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक रस्ते परिसर व गटारी श्रमदान म्हणुन स्वच्छ करण्याचे काम करतात येथील अंतर्गत रस्ते संपूर्णपणे खराब झालेले आहेत रस्त्यात खडडे पडलेले असून रस्त्याला गटारीचे स्वरूप आले आहे . संपूर्ण वस्तीला पिण्याचे पाणी पुरवठा केला जातो त्या टाक्या स्वच्छ करत नाहीत किव्हा त्यामध्ये निर्जंतुक पावडर तर कधीच टाकत नाहीत त्यामुळे येथील नागरीकाच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो . या प्रगाभाचे तीन सदस्य आहेत पण ते नावालाच आहेत ह्यांना जनतेने निवडून दिलेले याच भान याना राहील नाही . यांनी पूर्णपणें या प्रभागातील कामाकडे कायम दुर्लक्ष केलेलं आहे . त्यामुळे येथील नागरीक नाराज असुन दलित वस्तीचा तीन चार वर्षाचा निधी गेलो कुठे का शासनाने दिलाच नाही मग आला तर तो कागदोपत्री आला आहे . का गायप केला गेला हा प्रश्न येथील नागरीकांना पडला आहे

या सर्व कामाची उदासिनता पाहून भिमनगर मधील महादेव लिंबाजी लोखंडे बिबीसेन विठल लोखंडे सोहम अविनाश लोखंडे सतिश विनायक माने या युवकांनी संपूणी चौकातील परिसर स्वच्छ करून ग्रामपंचायतचा जाहीर निषेध व्यक्त केला असून येथील आंबेडकरी जनतेतुन यानी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे

Related Articles

ताज्या बातम्या