धाराशिव जिल्हा प्रतिनिधी…..
महाराष्ट्र शासनाच्या वतीने मनमानी होत आहे, महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा महाराष्ट्र शासन आणत असून सदर कायद्यान्वये संविधानाने जनतेला सार्वजनिक ठिकाणी मत आंदोलनाच्या माध्यमातून व व्यक्तीगत पणे व्यक्त होणे यावर बंधन या विधेयकाद्वारे शासन घालत असून संविधानाने दिलेला अधिकार हे शासन हिसकावून लोकांचा घेत आहे. म्हणून हे शासन संविधान विरोधी आहे.यांचा सर्वच विरोधीपक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, संविधानाचे चौकटीत राहून या जनता विरोधी कायदा पास होणार नाही यासाठी रस्त्यावर उतरून यांचा तीव्रपणे विरोध केला पाहिजे, आम्ही यांना आमच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सभागृहात पाठवून दिले आहे.याची जाणीव राज्यकर्त्याना करून देण्यासाठी संविधाना प्रमाणे योग्य जनहितार्थ सभागृह चालवणे, सभागृहात संविधानाला धरुन कायदे करणे याला संविधान माणने म्हणतात व संविधानाचा आदर करतात असे आपण मानतो पण संविधानाशिवाय मनमानी करणे म्हणजे संविधान हळुहळू निकामी करणे हेच काम घाईघाईने राज्य सरकारने घालवले आहे. असे कायदे आणून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केले जात आहे.विरोधी पक्षातील कोणी आमदार खासदार माजीमंत्री या विषयावर बोलताना दिसत नाहीत. बोललं तर त्यांच्या मागं चौकशी लावून त्याचा आवाज बंद करण्यात येतो.तोच प्रकार जनते सोबत करण्याचा डाव शासनाने चालवला आहे. हे शासन जनतेला त्यांचं तोंड बंद करण्यासाठी हा कायदा आणु पाहात आहे. आपण आता शांत बसून चालनार नाहि संविधानाने नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा हि काळजी घेतली गेली. त्यात तोडफोड म्हणजे संविधान बदलाचे संकेत असू शकते त्यामळे आपल्या हक्क व अधिकार संविधानाने दिलेली देणं आपणाला याविधेयकाला विरोध करुन आपण रस्त्यावर येवून संवैधानिक मार्गाने लढा देऊया… श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या वंचित बहुजन आघाडी या बॅनर खाली लढा उभारुया आणि श्रद्धेय अँड प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब साथ देवु या..
वंचित सारे एक होऊ सत्ता आपल्या हाती घेऊ….
आर एस गायकवाड सहसचिव वंचित बहुजन आघाडी जिल्हा धाराशिव