spot_img
spot_img
spot_img

पत्रकारांकडे निपक्षपाती न्यायीक भुमिकेच्या दृष्टीने पाहीले जाते : गवळी गुरुजी 

नंदगाव प्रतिनिधी . (शाम नागिले): पत्रकारीता म्हणजे लोकशाहीचा चौथा खांब आहे.पत्रकारांकडे सामान्य जनता निपक्षपाती न्यायीक भुमिकेच्या दृष्टीणे पहाते तेंव्हा पत्रकारानी निपक्षपातीपणे पत्रकारीता करावी असे प्रतिपादन’ आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते तथा सेवा निवृत मुख्याध्यापक कैलास गवळी गुरुजी यानी नळदुर्ग येथे बोलताना केले.

या बाबत सविस्तर असे की,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई च्या महाराष्ट्र प्रेदश कार्यकारणी सदस्य म्हणून मराठवाडा विभागातून जळकोट ता. तुळजापूर येथील पत्रकार अरुण लोखंडे यांची बिनविरोध निवड झाल्या बदल त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले ) शहर शाखा नळदुर्ग च्या वतीने येथील पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयात रिपाइं (आठवले) चे जेष्ठ नेते दुर्वास बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारंभाच्या कार्यमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गवळी गुरुजी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की पत्रकार अरुण लोखंडे यांचे सामाजिक कार्य उलेखनिय असून परकार संघाने त्यांची केलेली निवड ही सार्थ आहे.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अरुण लोखंडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

या कार्यकमाचे प्रास्ताविक रिपाइंचे जिल्ह उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यानी केले तर सुत्रसंचलन रिपाइंचे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के. गायकवाड यानी केले व अभार प्रदर्शन रिपाइं नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे यानी केले.यावेळी पत्रकार संघाचे मंत्रालयीन प्रतिनिधी अहमद शेख, दलित पँथरचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा पत्रकार शामकांत नागीले रिपाइंचे महादेव कांबळे, दत्ता सुरवसे,देवानंद लोंढे,आरविंद लोखंडे,जयभिम वाघमारे, मुर्ती शिल्पकार जिवन गुळे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या