भारतीय संविधान सन्मान परिषदेत दलित पँथर संघटनेचा सहभाग!*
ता. शिरोळ, जि. कोल्हापूर..(प्रतिनिधी अजिंक्य मस्के)
भारतीय संविधानात आलेली समता- बंधुता- स्वातंत्र्य ही मूल्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असून आज प्रचलित व्यवस्थेमार्फत समतेला तडा दिला जात आहे आणि भारतीय संविधानाचे मूल्ये व्यवस्था लाथाडली जात आहे, असे विधान दलित पँथर चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ गायकवाड यांनी केले. अन्यायाविरोधी बंडकरणारी पँथर परत उभी राहली पाहीजे.
संविधान सन्मान परिषद संयोजन समितीमार्फत सदर संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रबोधनात्मक कार्यक्रम अनिरुद्ध वनकर मी वादळ वारा हा कार्यक्रम अतिशय जल्लोषात पार पाडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आमदार सतेज पाटील उर्फ बंटी पाटील( मा. गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य),
कार्यक्रमाचे उद्घाटक उद्यानपंडित मा. गणपतराव आप्पासाहेब पाटील, मा. समित कदम, आमदार अशोकराव माने, दलित पँथर चे प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड, दलित पॅंथर सातारा जिल्हाध्यक्ष अमोल पवार, आप्पासाहेब चकोते अशा अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरच्या मंगलमय उपस्थितीत संविधान सन्मान परिषद संपन्न झाली.
अन्याय सहन करायचा नाही, अन्याय होऊ दयाचा नाही.
अन्याय करणाऱ्याला पँथर स्टाईलच्या भाषेत प्रतिउत्तर देण्यासाठी अशा आक्रमक संघटनेची आवश्यकता आहे. अन्याय तेथे प्रतिकार ही आमची भूमिका आहे.
आणि आत्ता तोच जोश तीच उमेद पुन्हा घेऊन येत आहे 1972 ची पँथर पुन्हा झंझावात…
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक – रमेश उर्फ बापू शिंदे व त्यांचे सर्व सहकारी यांनी केले होते. खरंच खूप धन्यवाद त्या सर्व पँथरचे… सर्वांना क्रांतिकारी जय भिम..🙏💙