वागदरी (एस.के.गायकवाड): तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या ऊसासे बिल त्वरित द्यावे या मागणी साठी गोकूळ शुगर लि.समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
वागदरी ता. तुळजापूर येथील ऊस उत्पादक शेतकर्यानी ऊस गाळप हंगाम २o२४- २o२५ मध्ये धोत्री (जिल्हा सोलापूर) येथिल गोकूळ शुगर लि.धोत्री येथे उरु गाळपासाठी पाठविला होता. ऊस घेवून जाण्या पूर्वी गोकूळ शुगर लिं. ने शेतकऱ्यांच्या उसाला २७५५ रू. प्रती टनाल भाव देण्याचे आश्वासन देवून ऊस बिल थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल असे सांगीतले होते.शेतकऱ्याच्या फडातुन ऊस जावून सहा महिने होत आहेत.
परंतू अध्याप एक दमडीही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाला नाही. वेळोवेळी लेखी व तोंडी मागणी करूनही गोकूळ शुगर लि. च्या प्रशासनाने शेतकऱ्यांच्या ऊस बिलं मागणी कडे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकतरी कुटूंबावर उपासमारीची वेळ आली असून कटूंबाचे आर्थिक नियोजन बिघडले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्याच्या मुला मुलींचा विवाह लांबणीवर पडला आहे. तर काही शेतकऱ्याच्या विद्यार्थांची शैक्षणीक फीस भरावयाची थांबली आहे. केवळ पैसा अभावी विद्यार्थ्यांचे शेक्षणिक नुकसान होप्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी वागदरी येथिल शेतकऱ्यानी जो पर्यंत उस बिलं खाल्यावर जमा होत नाही तो पर्यंत गोकूळ शुगर लि. गेट समोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार करून दि ७ फेब्रूवारी २o२५ पासून बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. या मध्ये रामचंद्र यादव, अमोल पाटील,कल्लाप्पा वाघमारे, हणमंत वाघमारे, मोहन धुमाळ, किशार सुरवसे, राजकुमार पवार, सतिश बिराजदार, फत्तेसिंग ठाकूर, निव्रत्ती बिराजदा, रहिम शेख, रामसिंग परिहार, भरतसिंग ठाकूर सह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.