जिल्हा प्रतिनिधी(शाम नागिले ) मागील काही दिवसांपूर्वी राज्यात तापमानाचा आलेख वर चढत आहे. सूर्य तापल्यामुळे धाराशिवसह अनेक शहरांमध्ये, गावामध्ये चाळीस अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे, त्यामुळे येलो अलर्ट देण्यात आला आहे. आता उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कर्नाटक आणि परिसरात चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे मराठवाडा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दरम्यान आज धाराशिव सह इतर शहरे व गावामध्ये यंदाच्या वर्षातील 40 अंश इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात सूर्य दररोज आग ओकू लागल्यामुळे दिवसभर रस्ते सुन्न पडू लागले असून अघोषित कर्फ्यु लावल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे
धाराशिव जिल्ह्यात उन्हामुळे वृद्ध नागरिक लहान मुले आजारी पडत असून गरोदर महिला तसेच लहान शिशु यांची काळजी घेतली जावी आणि त्यांच्या बाबतीत दक्ष रहावे अशा सूचना प्रशासनाने आरोग्य विभागास दिल्या आहेत.