अणदूर प्रतिनिधी. राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी १९ व्या शतकात भारत देशामध्ये सामाजिक आणि धार्मिक क्रांती घडवून आणली.सतत आंदोलनरत राहून शुद्राति शुद्रांसाठी आपल्या प्रफुल्लित आयुष्याची कुर्बानी देणारा हा
महामानव.देवचिकित्सा,धर्मचिकित्सा,पुराणचिकित्सा करणे ज्या काळात मोठा गुन्हा मानला जाई त्या काळात या बंडखोर पुरुषाने देवाची,धर्माची,पुराणाची आणि धर्मग्रंथांची केवळ चिकित्सा नाही तर शस्त्रक्रिया केली.धर्माच्या नावावरिल पुराणकंड्यांची त्यांनी टांगलेली लक्तरे भूदेवांना घायाळ करुन गेली.ब्राह्मणी धर्माची,धर्मग्रंथांची आणि त्यातून जन्माला आलेल्या कर्मकांडांची सत्य चिकित्सा पहिल्यांदा जोतीरावांनी केली.ब्राह्मणी व्यवस्थेच्या महाजालात शरपंजरी पडलेल्या बहूजन समाजाला मूक्त करणे हा फुल्यांनी आपल्या जीवनाचा अजेंडा मानल्यामुळे त्यांचा प्रत्येक वार वर्णाभिमान्यांच्या वर्मावर बसला.राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचे साहित्य शत्रू-मित्राची ओळख करून देणारे,खऱ्या खोट्यात फरक करायला शिकवणारे आणि बहुजन समाजाची तर्कशक्ती विकसित करणारे बंडखोर आणि जीवनवादी साहित्य आहेस्त्री शिक्षणाचे जनक थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अणदूर ग्रामपंचायत वतीने विनम्र अभिवादन करताना कैलास बोंगरगे गुरुजी सरपंच रामचंद्र आलुरे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड,लिपीक संतोष चव्हाण