अणदूर प्रतिनिधी . डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा लढा या अशोक जानराव लिखीत पुस्तकाचं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदें साहेब यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले . सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि लेखक साहित्यिक दत्ता गायकवाड साहेब होते
प्रमुख पाहुणे बसपाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अँड संजीव सदाफुले प्रकाशक डॉ.धम्मपाल माशाळकर चेतन नरोटे डॉ सुरेश कोरे, महापालिका आयुक्त उपस्थित होते.
कोणताही लढा यशस्वी करण्यासाठी समाजातील एकजूट आणि नेतृत्व करणारे यांच्या सत्ता हातात हवी अशोक जानराव यांना नगरसेवक करण्यात ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व तत्कालीन,सन्माननीय कार्यकर्ते, आणि मतदार यांना या लढ्याचे श्रेय द्यावे लागेल.असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदें साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले.आजचा समाज आणि कालचा समाज यामध्ये खुप फरक पडला आहे.
समाजाचं कामं करणारी माणसं फार कमी आहेत.आज पक्षीय कार्यकर्ते भरपूर प्रमाणात आहेत.सामाजीक जाणिव असणारे लोकांना राजकीय संधी खुप कमी प्रमाणात मिळते.
जानराव साहेब यांना थोडीचं संधी मिळाली पण त्यांनी त्यां संधीचे समाजाला खुप मोठी उपलब्धी करून दिली ती म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान.अशा माणसाला जपावं निश्चितच ते समाजाला निराश होवू देणार नाहीत याची मला खात्री आहे.
या परिसरात सर्व समाज या उद्यानात शरीर सौष्ठव व अभ्यास करताना दिसतात.या उद्यानाच्या बाजुची आणखी थोडी जमीन या उद्यानात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिंदे साहेब म्हणाले. जानराव यांच्या या डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा लढा या पुस्तकास शुभेच्छा दिल्या.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे ,अँड शिवशंकर घोडके ,पृथ्वी राहुल सरवदे,शाम शिंगे प्रविण कांबळे, सातपुते, लोखंडे, आर एस गायकवाड प्रा.शिवाजी बनसोडे सह वाचक जेष्ठ नागरिक पत्रकार महिला विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते