जळकोट (अरुण लोखंडे ) येथून जवळच असलेल्या उमरगा तालुक्यातील मौजे कोथळी येथील ४० वर्षीय युवक मिलींद शरणू कांबळे यांच्यावर धार धार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळ जनक घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे
याबाबत प्राप्त माहीती अशी की, कोथळी ता.उमरगा येथील जखमी तरुण मिलींद कांबळे हा आपला रिक्षा घेवून दि ४ मे रोजी रात्री प्रवाशी घेवून मुरूम मोडवरून मुरुमकडे रात्री दहा अकरा वाजण्याच्या दरम्यान निघाला असता मुरूम कडे जाणाऱ्या रस्त्याच्याच्या बाजूला असलेल्या महावितरण कंपनीच्या पॉवर हाऊस जवळ रिक्षा आला असता अंधारात दबा धरून बसलेल्या बेरड जातीतील गावगुंडनी रिक्षा आडवून तुमच्या खादानामुळे आमचे नुकसान झाले आहे आम्ही बेघर झालो आहोत म्हणुन परमेश्वर विठ्ठल गुडरंगे,अभि रुपचंद मंडले आणि अविनाश तुळशिराम फिरंगे रा.सर्व कोथळी यांनी धार धार शस्ताने हल्ला करून आरोपी फरार झाले आहेत.
सदर जखमी तरुण मिलींद कांबळे यांची आमचे प्रतिनीधी यांनी सोलापूर येथील मार्कंडेय हॉस्पिटल मध्ये जावून माहीती घेतली असता त्यानी सांगीतले की सन २०११ साली माझे चुलत भाऊ विजय कांबळे यांची पाणी भरण्याच्या कारणावरून वादविवाद झाला होता.
ते प्रकरण गावपातळीवर मिटविण्यात आले होत आणि एक वर्षानी माझा भाऊ पुण्याहून गावी आल्यानंतर मागील भांडणाचा राग मनात धरून यांच गावगुंडानी माझ्या भावाचा निर्घूण पणे हत्या करून जीव मारून टाकले होते.त्यावेळेस आम्ही सर्वजन याच्या विरोधात आवाज उठविला होता काहीना या प्रकरणात सज्जा झाली आहे त्याचाच राग म्हणत धरून तुम्हाला आता आम्ही संपणावर म्हणून माझ्यावर या नरधामाने हल्ला केला असल्याचे सांगितले. सदर प्रकरणी संबधीत मुरूम पोलीस ठाण्याचे सपोनि यांनी हॉस्पीटल मध्ये जावून जखमी मिलीद कांबळे यांचा रितसर जबाब घेवून या संदर्भात दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपीवर भा .द.वि . १०९ , १२६ , (२) ३५१ ( २) ‘ ३ ( ५) ३ ( ५ ) . प्रमाणे मुरुम पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस उपविभागीय आधिकारी सदाशिव शेलार स .पो निरिक्षक दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय एन एम गाडेकर हे करित असून कोथळी येथील नागरीकांनी मुरूम पोलीस ठाण्यात येवून संबंधीत आधिकारी याची भेट घेवून आरोपीला तात्काळ अटक करून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे