वागदरी ( एस.के. गायकवाड):
तुळजापूर विधानसभा मतदार संघातील नळदुर्ग सह परिसरातील जवळपास ५० ते ६० गावातील समस्या जानूण घेण्यासाठी तुळजापू विधानसभा मतदार संघाचे विद्यामानआमदार राणाजगजितसिंह पाटील यानी दि.१६ मे २o२५ रोजी सकाळी ११.३० वा.दरम्यान नगर परिषद नळदुर्ग कार्यालयाच्या प्रांगणा जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या जनता दरबारास उत्सफूर्त प्रतिसाद मिळला असून नळदुर्ग येथिल मरिआई मैदानास संरक्षण भिंत बांधावी, नळदुर्ग येथून जवळच अंतरावारअसलेल्या वागदरी शिवारात मंजूर असलेले व गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले वागदरी साठवण तलावाचे काम सुरू करावे, शेतकऱ्यांचा पिक विमा मिळवा, आदी सह नळदुर्ग शहरातील व परिसरातील गावा गावातील अंतर्गत विकासकामे करावीत, आदी मागण्यासह वैयक्तीक आडीआडचणी बाबत आमदार राणा दादा यांच्यासी चर्चा करून निवेदने यावेळी देण्यात आली
या प्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी,अनिल काळे, अँड. दिपक दादाअलूरे,दत्ता राजमाने,विलास राठोड,रंजना राठोड,बसवराज धरणे,साहेबराव घुगे,श्रमिक पोतदार,आशिष सोनटक्के पांडुरंग पुदाले,Cbse बताले महादेव पाटील,विजय शिंगाडे,दयानंद मुंडके,धिमाजी घुगे,सागर हाजारे,सह वागरी, गुजनूर, शहापूर, दहिणा, होर्टी, मुर्टा, जळकोट, सिंदगाव, निलेगाव सह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.