spot_img
spot_img
spot_img

करिअरच्या वेगवेगळ्या वाटा : ईश्वर नांगरे 

 

(समर्थ क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार )

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

 

दहावी – बारावीनंतर करिअरच्या वेगवेगळ्या वाटा आहेत. विद्यार्थ्यांनी एक वाट पक्की करावी. असे विचार नळदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे यांनी जळकोट येथे मांडले.

जळकोट येथील समर्थ क्लासेसच्यावतीने जळकोट व परिसरातील इयत्ता – दहावीत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी विद्यार्थी, पालक व माता यांना मार्गदर्शन करताना ईश्वर नांगरे हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री .रमेश औसेकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत स्वामी, मेघराज किलजे, पत्रकार विजय पिसे ,संजय वाघोले, आदि उपस्थित होते.

समर्थ क्लासेसच्यावतीने अणदूर येथील सुयश क्लासेसचा विद्यार्थी नमन गणेश कांबळे यांनी ९९.४०% गुण मिळवून दहावी परीक्षेत तर हंगरगा (नळ)येथील राजीव गांधी विद्यालयाची विद्यार्थ्यांनी चंदना संजय वाघोले हिने ९१.४०% गुण मिळवून दहावी यश मिळवल्याबद्दल व जळकोट केंद्रातून समर्थ क्लासेसचे विद्यार्थी तनुजा लक्ष्मण चव्हाण प्रथम, समृद्धी चुंगे द्वितीय तर श्रुती हिंडोळे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक इयत्ता दहावीमध्ये मिळवल्याबद्दल व त्याचबरोबर इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी वैभवी पिसे हिने स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल व गुणवंत विद्यार्थी अस्मिता ठोंबरे, ऋषिकेश सुरवसे, अंकिता सुरवसे, पूजा बिराजदार, सुधीम चव्हाण, अस्मिता यादगौडा, श्रीनिवास गीते, प्रांजल सगर, संस्कृती गायकवाड, अबररार पठाण, वैष्णवी सुरवसे, प्रतीक्षा मरडे, हर्षदा पात्रे, नेहा मोरे, राज दूधभाते, मीरा कागे, शुभांगी कुंभार, गणेश सावंत, अपूर्वा गंगणे, विठ्ठल अंगुले, अक्षरा कांबळे, पद्मजा कदम, व्यंकटेश स्वामी आदि दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा द इंग्लिश लँग्वेज पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात समर्थ क्लासेसचे संचालक रामशेट्टी पाटील यांनी समर्थ क्लासेसच्या माध्यमातून गेल्या सात आठ वर्षापासून विद्यार्थी घडवण्याबरोबर विद्यार्थी हे संस्कृत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आतापर्यंत समर्थ क्लासचे विद्यार्थी यांनी जीवनात चांगली प्रगती केली आहे. हेच क्लासचे यश आहे. यावेळी चंद्रकांत स्वामी, रमेश औसेकर, मेघराज किलजे यांनी मार्गदर्शन केले. समर्थ क्लासचा विद्यार्थी राज दूधभाते यांनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्राची सुरवसे व कु. वैष्णवी बिराजदार यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक ,माता , गावातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या