जन जीवन विस्कळीत दैनदिन व्यवहारावर परिणाम
जळकोट (अरुण लोखंडे ) निर्सगाच्या लहरीपणामुळे अवेळी पडणाऱ्या पावसामुळे सर्वसामान्य नागरीकांचे हाल होत असुन जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी वर्ग त्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे .
याबाबत प्राप्त माहिती अशी की राज्यात आणि ग्रामीण भागात वळीवाच्या पावसाने गेल्या एक आठवडाभरापेक्षा जास्त दिवस झाले आहे सतत पाऊस पडत आहे . या सतत पडणारऱ्या पावसामुळे सर्व सामान्य नागरीकांचे ग्रामीण व शहरी भागात हाल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे . ज्याचे हातवर पोट आहे अस्या मजुरदार वर्गाच्या नागरीकांच्या हाताला काम नाही . काम नसेल तर कुटूब चालायचे कसे . सतत पाऊस पडत असल्याने शेतातील कामे थांबली आहेत शेतकरी पेरणीपूर्व मशागत करताना नांगरणी कुळवणी करने करळ वेचने जमीन पेरणी साठी स्वच्छ करणे ही बारीक सारीक कामे करतो त्यातुन गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळते आणि त्या कामातुनच मिळालेल्या मोबदल्यात त्याचा उदरर्निवह चालतो मात्र पाऊस काही थाबण्याचे नाव घेत नाही रोज किमान एक दोन तीन तास पाऊस पडत आहे तर कधी कधी दिवसभर पाऊस पडत आहे त्यामळे जनजीवन विस्कळीत झाले आहे दैनदिन व्यवहार ठप्प झाले असून याचा व्यवहारावर सुद्धा परिणाम झाल्याचे चित्र बाजारपेठेत पाहावयास मिळते आहे . यामुळे शेतकरी राजा सुद्धा त्रस्त झाला आहे पेरणी पूर्व मशागत करून घ्यावी म्हणलं तर पाऊस काही थांबत नाही शेतात पाणी पाणी झाले आहे . चार दिवस उघाड दिले तर जमीनीचा वापसा होईल वापसा न झाल्याने शेत नागरने कुवळणे अनखी झाले नाही काही दिवसावर खरीपाची पेरणी येवून ठेपली आहे शेतकऱ्यानी बि बियाणे खत जे काही पेरणीसाठी लागणारे साहित्य घेऊन ठेवले आहे मात्र पाऊस थांबण्याचे नाव काही घेत नाही . खरीपाची पेरणी वेळेत झाली तर शेतकऱ्यासह मजुरदार वर्गाचे कल्याण आहे . नगदी पैसे मिळवून देणारे ही खरीपाची पेर असते सर्वांना काम मिळते कामाच्या मोबदल्यात पैसा मिळतो आणि सर्व सामान्या सह शेतकरी आपले चरिर्थात चालवू शकतो नाही तर असाच जर पाऊस कायम पडस राहीला तर ओल्या दुष्काळाचे सावट येवून उपासमारीची वेळ सर्वावर येवू शकते हे नाकारता येत नाही . शेवटी काही झालं तर निसर्ग राजावर अवलंबून आहे म्हणजेच तारणार आणि मारणार तोच आहे .