spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा रोडवर मोठ मोठे खड्डे तर बऱ्याच ठिकाणी पाणीच पाणी राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्राधिकरण आधिकाऱ्याच्या नावन चांग भल

 

जळकोट (अरुण लोखंडे ) राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ६५ वर जागो जागी मोठ मोठाले खड्डे पडल्याने वाहन चालतावाना मोठी कसरत करावी लागत असुन अपघाताचे प्रमाण वाढले आहे .

याबाबत प्राप्त माहीती अशी की राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्राधिकरण विभागाच्या वत्तीने गेल्या अनेक वर्षापासून रोडचे कामकाज चालू आहे . पण मात्र आद्याप तरी पूर्णताह रोड तयार झालेले नाहीत अनेक ठिकाणी अर्धवट काम झालेले आहेत उमरगा ते सोलापूर पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असुन रस्त्यात अनेक ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत . जळकोट ते मुर्टा पाटी बायपास रोडपर्यंत तर वाहन चालकाना वाहन चालविणे खूप अवघड झाले आहे . अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने मोठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे . संपूर्ण रोडवर पाणी साचलेले असून पाणी खाली कुठे खड्डा आहे वाहनधारकांना समजत नसल्याने दुचाकीस्वाराना अनेकदा धोका झालेला आहे . जळकोट हून नळदुर्गला जायचे म्हणटले तर आपलं घर ते आलियाबाद बोरी नदीवरील पुलावर तर मोठ मोठे खड्डे पडले आहेत समोरून एखादे वाहन आले की खडा चुकविण्याच्या नादात या ठिकाणी अनेकदा अपघात झालेले असुन अनेकाना या ठिकाणी आपला जीव गमवावा लागले आहे पण मात्र रस्ता काही तयार होत नाही .

अनेक लोकप्रतिधी यांनी रोडची पाहणी केली मात्र त्यांना रस्ता चांगला झाला आहे का? रस्त्यात खडडे आहेत का? हे काही दिसले नाही मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र त्यांचे व्हीडीओ बनवून रिल बनवून प्रसिद्धी केली मात्र रस्त्यातील खडयाचे मात्र छायचित्रण त्यानाही करता आले नाही त्या लोकप्रतिनिधींना रस्ता खराब झाला आहे संमधीताला याबाबत सूचना कराव्यात असे कोणीही सांगितले नाही . राष्ट्रीय रस्ते महामार्गाचे आधिकारी तर गेंड्याची कातडी पाघरल्यागत वागत आहेत अनेक वेळा संमधीताना रस्त्याकामी लेखी तोंडी कळविले काही ठिकाणी नागरीकांनी रस्ता लवकर व्हावा म्हणुन रास्ता रोको अंदोलने केली मात्र यांच्यावर काही परिणाम झाला नाही सध्या खड्यात रस्ता की ‘ रस्त्यात खडडा पाणीत रस्ता की पाण्यावर रस्ता हेच प्रवाशासह वाहन धारकांना समजत नाही कालच माझलगावचे भाजपाचे माजी आमदार टी आर देशमुख साहेब यांच्या वाहन चालकास खड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने गाडीचा अपघात होऊन देशमुख याचा मृत्यू झाला हे फक्त खराब झालेल्या रस्त्यांमुळे . याला जबाबदार कोण ? सदर रस्त्यातील खड्डे बजवून रोडवर येणाऱ्या पाण्याचा निचरा करावा अशी मागणी प्रवाशासह वाहनधारका मधून होत आहेत सदरच्या खराब रस्त्यांवर अपघात होऊन काही मानवी नुकसान झाले किंव्हा जीवीत हाणी झाली तर राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या संमधीत आधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यात येवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे

Related Articles

ताज्या बातम्या