वागदरी(एस.के.गायकवाड ):
बहुजन समाजात पिडीजात कोणी गर्भ श्रीमंत बागायत जमिनदार नाही किंवा राजकीय नेतृत्व नाही त्यामुळे बहुजन मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणा शिवाय दुसरा पर्याय नाही तेंव्हा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण पुर्ण करून स्वतःची पर्यायाने समाजाची सर्वांगिनण प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा असे असे आवहान रिपाइ (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यानी वागदरी ता.तुळजापूर येथे बोलताना केले.
भिमनगर वागदरी येथील पंचशिल बुध्द विहार समाज मंदिरात समस्त बौध्द वांधवाच्या वतीने येथील इ.१o वी व १२ वी उत्तिर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी एस.के.गायकवाड बोलत होते.
प्रारंभी महिला कार्यकर्त्या सुगंधा सहादेव वाघमारे,माजी सरपंच तथा डॉ.आबेडकर जयंती उत्सव कमिटी चे अध्यक्ष नागनाथ बनसोडे, श्रामनेर चंद्रकात वाघमारे आदिंच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुध्द व महामानव डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून सामुदायिकरित्या बुध्द वंदना घेऊन इ. १० वी व इ.१२ वी उत्तिर्ण विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देवून पेढा भरवून यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी सुर्यकांत वाघमारे,भारत वाघमारे,उज्वला वाघमारे,वंदना वाघमारे श्रीदेवी वाघमारे, स्वाती गायकवाड, कोमल झेंडारे,गेदाबाई बनसोडे, सुष्मा वाघमारे,बाई वाघमारे, शकुंतला वाघमारे,इंदुबाई वाघमारे सह ग्रामस्त महिला विद्यार्थी मोठय संख्येने उपस्थित होते.