जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट आणि परिसरात पाऊसाने उघाड दिल्याने बळीराजाने पेरणी करण्यास जोमाने सुरुवात केल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे
गेल्या मे आणि जुन महिन्या पासून सतत पाऊस पडत असल्या कारणाने शेतकरी राजाला शेतीतील पेरणीपूर्व काम करण्यास खूप अडथळा निर्माण झाला होता कायम पाऊस होत असल्याने नागरीणी कुळवणे शेतातील करळ वचणे हे पाऊसामळे शक्य झाले नव्हते कारण रानावर पाणी आणि चिखल होता यावर्षी पेरणी होते की नाही म्हणून शेतकरी हावला दिल झाल्याचे पहावयास मिळत होते पेरणी साठी लागणारे सर्व बि बियाणे रासायनिक खत्ते घेवून ठेवले होते जवळ असलेल्या पैश्याने सर्व लगणारे साहित्याची खरेदी पावसाळ्या पूर्वीच करून शेतकऱ्यांनी ठेवली होती मात्र पाऊस रोजच पडत होतो अवेळी पडणाऱ्या पावसाने लहान मोठी तलावे भरून ओसाडून वाहत आहेत .
या आटवड्या मध्ये पाऊसाने थोडी विश्रांती घेतल्याने शेतकरी राजा आपली ढवळया पवळयाची खिलारी जोडी झुंपून शेतकऱ्यानी चाड्यावर आपली मुठ धरून काळी आईची ओटी भरण्यास सुरवात केलेली आहे काही शेतकरी लवकर पेरणी व्हावी म्हणून टॅक्टरवर पेरणी उरकून घेत आहेत आणि काही शेतकरी आपल्या जुन्या संस्कृती प्रमाणे बैलावर पेरणी करतानाचे पहावयास मिळत आहे
या वर्षी परिसरातील शेतकरी सोयाबीन उडीद तुर मुग आंबाडी बाजारी याची पेरणी जास्त प्रमाणात करत असल्याचे दिसते आहे . कारण या खरीपाचे पिकावरच शेतकरी आर्थिक बाजू सुधारते कारण हे नगदी स्वरूपात उत्पादन देणारी पिके असल्याने खरीपाची पेरणी वेळेत झाली तर शेतकरी सर्वसामान्य मजुरदार वर्ग सुखी राहातो प्रत्येकाला काम मिळते . खरीप पिकलं की सर्वांनाच आर्थिक बळकटी मिळते आणि या वर्षी पेरणी पूरक पाऊस झाल्याने पेरण्याही सध्या वेळेत होत असून जिकडे पाहावे तिकडे रानावर पेरणीची एकच धांदल उडल्याचे चित्र जळकोट आणि परिसरात पाहवयास मिळते आहे .