वागदरी ( एस.के. गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील आरळी (बु.) ग्राम पंचायतीच्य उपसरपंच पदी आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते भिमराव अर्जुन सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
येथिल उपसरपंच संजय नागनाथ पाटील यानी स्वइच्छेने राजीनामा दिल्याने आरळी (बु.) ग्रा.प.चे उपसरपंच पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी दि.१८ जून रोजी निवडनुक घेण्यात आली. या निवडणूकीत भिमराव सोनवणे यांचा एक मेव अर्ज दाखल झाल्याने निवाडनुक निर्णय आधिकारी यानी भिमराव सोनवणे यांची उपसरपंच पदी बिन विरोध निवड झाल्याचे घोषिति केले. यावेळी निवड निर्वाचन अधिकारी म्हणून पंचायत समिती तुळजापूरच्या कृषी विभागाचे विस्तार अधिकारी श्री.नडगे साहेब, ग्रामसेवक हमीद पठाण,तलाठी दयानंद काळे आदीनी काम पहिले.
भिमराव सोनवणे यांची उपसरपंच पदी निवड झाल्या बदल ग्रामस्तांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच किरण व्हटकर,संजय पाटील,गोविंद पारवे,मधुमालती पारवे, मनिषा तानवडे,ज्योती पोळे, अश्वीनी व्हटकर, छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश गवर्ळ, पोलीस पाटील युवराज पाटील, संजय पारवे, प्रशांत उकरंडे, भास्कर पारने, संगाप्पा उकरंडे, ताणाजी पारवे, बाळू गवळी, अनिल जाधव, चंद्रशेखरउकरंडे सह ग्रामस्त उपस्थित होते.