spot_img
spot_img
spot_img

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीची गेल्या सहा महिन्या पासुन पगारी बंद .

 

जेष्ठ नागरीक रोजच बँकेला मारतात चकरा पण शासन काही पगारी देईना : व्यथा वृध लाभार्थींच्या 

जळकोट (अरुण लोखंडे) तुळजापूर तालुक्यातील जळकोट आणि परिसरातील गावातील जेष्ठ नागरिक विधवा परितक्ता श्रावण बाळ योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्याना गेल्या सहा सात महिन्यापासून पगारी होत नसल्याने वृद्धाचे हाल होताना दिसत आहे .

याबाबत प्राप्त माहिती अशी की शासनाने गोरगरिब दारिद्री यादीतील जेष्ठ नागरिक व विधवा महिलाना श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून प्रति महीना १५०० रुपये प्रमाणे मानधन देवून त्यांना जीवन जगण्यासाठी आर्थिक साहाय्य करून त्याची होणारी परवड थांबावी हा उदात्त हेतू शासनाचा आहे मात्र गेल्या पाच ते सहा महीने झाले बऱ्याच लाभार्थी लोकांच्या पगारी बंद झालेल्या आहेत त्यांना पगार मिळत नाही त्यामुळे त्याची खूप परवड होताना चे चित्र सद्या दिसत आहे .

रोज वयोवृद्ध मंडळी काठी टेकवत बँकेला चक्करा मारतात बँकेत जातात बँकेतील कर्मचारी त्याना व्यवस्थित सांगत नाहीत काही गावपुढारी तहसिल कार्यालयात जातात काहीचे आधार कार्ड दाखवितात ते सांगतात बँकेत जावा त्याच्या पासबुकवर इंटरी करून आणा परत ती मंडळी बैकेत जातात बँकेतील मॅनेजरचा तर रुबाबच भारी यांच्या बापाची बँक असल्यागत जेष्ठ नागरीकांना तो बोलतो.येथे काही नाही तुम्ही तहसील मध्ये जावा परत ही मंडळी दुसऱ्या कडून पैसे मागुन गाडी पुरते पैसे घ्यायचे आणि परत तुळजापूर जायचे तेथे गेले की, काहीना आधार आपडेट करा काहीना सांगायचे बँकेत चौकाशी करा अस्या पद्धतीचा खेळ या लोकांनी मांडला असून सामान्य नागरीकांच्या जीवाशी खेळ मांडल्याचे पहावयाला मिळत आहे आणि गावातील पुढारी तालुक्याच्या ठिकाणीची संबधीत कर्मचारी याना बोलवणार एक दिवसांची जेष्ठ नागरीकांची गर्दी रूपी यात्रा भरावयाची आणि आधार कार्ड पासबूक घेवून या म्हणून सांगायचे ते जाणार संपूर्ण दिवस तेथे घालवणार आणि निष्पन काय तर आधार आपडेट करा बँकेत चौकाशी करा अशी वल्गना करणार परत मंडळी निराश होऊन घरी जाणार हाच कार्यक्रम गेल्या सहा सात महिन्या पासून चालेला आहे पण पदरी काहीच पडत नाही .

बऱ्याच लोकांचे काही गावातील दलाल पुढारी यानी ज्याचे वय बसत नाही त्याचे आधार आपडेट करून वय वाढवून घेतले या कामी त्यांच्याकडून २००० रु घेण्यात आले पगारी चालू करण्या कामी ५००० रु घेतले काही दिवस पगारी मिळाल्या नंतर आधार आपडेट करण्यात आले वयात तफात निघाली त्यामळे बऱ्याच लोकांच्या पगारी बंद झाल्या याला गावातील दलाल जबाबदार की शासकीय कार्यालयातील दलाल जबाबदार यांनी यांची पोळी भाजुन घेतली पण गरीबाच्या घशातील भाकरी काढण्याचे महापाप त्यांनी केले त्या दलालावर योग्य कार्यवाही होवून वयोवृध्द गोर गरीब लोकांच्या शासनानी पगारी तात्काळ देवून सहकार्य करावे अशी मागणी लाभाधारक मंडळी कडून होताना दिसत आह

Related Articles

ताज्या बातम्या