आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
पंढरपूर ते देहू ते पंढरपूर पायी वारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल होताच उद्योजक व वारकरी संप्रदायातील महेश साहेबराव जाधव यांच्याकडून मोफत अन्नदान करून वडिलांचा वारसा पुढे चालवण्यासाठी सिंहाचा वाटा होता. या पालखी सोहळ्यात दिंडीचे प्रमुख ह.भ. प ज्ञानोबा किसन कोळी महाराज ता. लोहारा जि. धाराशिव यांचे विशेष योगदान राहत आहे. पालखी सोहळ्यासाठी जाधव परिवारातील सांप्रदायातील सहवास लाभल्यामुळे अविरतपणे त्या काळात ते कार्य करीत असतात.सामाजिक आर्थिक आणि माणुसकी जपत साहेबराव नामदेव जाधव जिद्दीने,चिकाटीने आणि घामाने करीत होते. त्यांचाच हा वारसा तब्बल चौदा वर्ष अविरतपणे चालू आहे त्यासाठी भाकरी,बेसन,खर्डा चटणी अशा रुचकर जेवणाची मेजवानी त्यांनी केली होती. त्यामध्ये सर्व वारकरी दिंडी प्रमुख,वादक,टाळकरी, माळकरी आणि माता माऊलीचा विशेष सहभाग होता. त्यामुळे आमचं हेच पंढरपूर आहे.दिंडी आमचं सर्वस्वी आहे सुख यातच सामावलं आहे.या सर्व गोष्टी या सोहळ्यात त्यांच्या आनंदातून दिसून येत होत्या. सर्वांनी मनोभावे भजन करून पालखीचे दर्शन घेतल्यानंतर भोजनास सुरुवात केली आणि अशा रुचकर भोजनासाठी तब्बल पाच तास जाधव घराण्यातील मित्रपरिवार पाहुणे आणि सर्व स्त्रिया मनसोक्त कार्य करीत होत्या. २००७ ते २०२५ पर्यंत कधीही खंड न पडता अविरतपणे चालू ठेवलं आहे. म्हणून भक्तिमय वातावरण त्या घरात दिंडीमध्ये आणि त्यावेळी नाचून दंग होणाऱ्या भक्तामध्ये दिसून येत होता. हा एक साक्षात परमेश्वर दर्शन देऊन गेल्यासारखे वाटत होते. साहेबराव जाधव यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी मुलं चालवत आहेत पण त्यांची पत्नी श्रीम. बबीता साहेबराव जाधव त्यांचे सर्व मुलं मुली आणि जावयासमोर माझ्या नंतर सुद्धा हा वारसा असाच पुढे चालू ठेवा असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं आहे.प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहणारे जावई श्री.कैलास तुळशीराम सोनवणे-शेटफळ,श्री.राम सौदागर सूर्यवंशी- नारंगवाडी,कवी.सुरज रामचंद्र अंगुले जळकोट, या दिंडी सोहळ्यात आपापल्या पत्नी समवेत तिन्ही जावई आवर्जून उपस्थित होते. त्याचबरोबर इतर पाहुणे आणि मित्रपरिवार सुद्धा उपस्थित होते म्हणून त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. त्यांच्या आनंदाला द्विगुणित करण्यासाठी हातामध्ये टाळ घेऊन आपली सेवा निस्वार्थ आहे. हे त्यांनी त्यावेळी दाखवून दिलं. या दिंडी सोहळ्यात वेळोवेळी सहकार्य म्हणून श्री.योगेश कांबळे,श्रीम.राजश्री कैलास सोनवणे,योग्यश्री सुरज अंगुले सौ.शितल राम सूर्यवंशी,प्रमिला पवार,अरुणा पवार,साहिल पवार (मुंबई) अविनाश कांबळे, रोहिदास वाघमारे, सचिन सोनवणे,सुकन्या वाघमारे,चि. अधिराज कैलास सोनवणे, प्रांजल सुर्यवंशी,श्रीकृष्ण सावंत,राज सोंडकर, सुरज चौगुले,संजीवनी चौगुले, सौ.अनुसया कांबळे,
यांच्या सोबत अविस्मरणीय क्षण कायम मनात घरटं करून गेलं म्हणून तेच माझं पंढरपूर होय हीच भावना प्रत्येकाच्या मनामध्ये होती असे स्पष्ट संकेत दिसत होते.
एका काव्याप्रमाणे
“घोष होता ग्यानबा तुकाराम राऊळाची ही वाट सखाराम,
करी भक्ती चित्तात नृत्यलीला
पहा दिंडी चालली पंढरीला ”
हा प्रसंग अन्नदान करताना तंतोतंत लागू होतो.
आधी हाताला चटके मग मिळे भाकर म्हणून सहकार्य लाभलेले सौ.अश्विनी चौधरी, माया चौगुले, पदमा चौगुले,सुवर्णा माळी,मिरा तेलंगे,पुजा चौधरी, अंजली शिंदे,व्यंकट कांबळे इत्यादीचं अनमोल सहकार्य लाभले.