धाराशिव प्रतिनिधी:- कळंब तालुक्यातील पाण्याचा स्त्रोत वाढविण्यासाठी राज्य सरकारने मृद व जलसंधारण विभागाला विकास कामे करण्यासाठी कोट्यावधी रुपये दिले.या उलट कळंब तालुक्यातील या विभागाचे सर्व अधिकारी,गुत्तेदार यांनी म्रद व जलसंधारण उपविभाग कळंब अंतर्गत सन 2021-22-23 मध्ये जिल्हा मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी, सी.के. कलशेट्टी,उपअभियंता जे.व्ही.काकडे,शाखा अभियंता के एम साळुंखे,व संबंधित गुत्तेदार,या सर्वांनी संगणमताने सिमेंट बंधारे,पाझर तलाव दुरुस्ती,नाला खोलीकरण ही कामे न करत कागदोपत्री केल्याचे दाखवून कोट्यावधी रुपये उचलून शासनाची फसवणूक केली आहे. तर काही ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाची कामे करून त्याचेही कोट्यावधी रुपये उचलल्या प्रकरणी संबंधित अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर व ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गौतम धावारे हे दि.24/1/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या समोर आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या मागणीनुसार संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावीत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात )पक्षाच्या वतीने मागणी करून आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा दिला आहे.यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत,लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,रिपाई (ख)धाराशिव तालुकाध्यक्ष संपत सर्वदे,सतीश चंदनशिवे,वसंत खुणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.