spot_img
spot_img
spot_img

अणदूर येथील हुतात्मा स्मारकाचे संरक्षण भीतीचे बांधकाम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे

अणदूर प्रतिनिधि 
अणदूर… मराठवाडा मुक्ती संग्रामात शहिदांना मानवंदना म्हणून मराठवाड्यातील स्वातंत्र सैनिक यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारकाची निर्माती झाली आहे.या हुतात्मा स्मारकांचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी जनतेची जितकी आहे तितकीच प्रशासनाची आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे आहे परंतु जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आल्याने सध्या अणदुरचे स्मारक हे गाडीतळ झाले आहे प्रत्येकाच्या दोन चाकी तीन चाकी चार चाकी मोठ्या गाड्या एवढेंच नव्हे तर जेसीबी मशीन पोकलेन त्या ठिकाणी लावल्या जातात. गेल्या दोन वर्षांपासून सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करताना केंद्र शासनाच्या वतीने हुतात्मा स्मारकांचे पावित्र्य राखण्याची सुरुवात केली,

व महाराष्ट्र शासनाने हुतात्म्यांच्या स्मारकाची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी शासनाने एक निधी उपलब्ध केला होता त्याचाच एक भाग म्हणून अणदूर या ठिकाणी संरक्षक भिंत, मेन गेट दुरुस्त करून हुतात्म्यांच्या आठवणी जपण्यासाठी आपल्या गांवात अणदूरचे स्मारक जतन व्हावे म्हणून, रूपये तेरा लक्ष मंजूर झाल्याचे ग्रामसभा घेऊन यां योजनांची माहिती गावाला दिले आहे. पण काही नवख्या गुत्तेदारांना त्याची जबाबदारी दिली होती परंतु ते काम अजूनही अर्धवट अवस्थेत आहे. संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे आणि अर्धवट आहे. गेटचे काम पूर्ण झालेले नाही प्लास्टर नाही, स्मारकांची दुरावस्था आहे. तरी प्रशासनाने, शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.यासाठी मा.जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड यांनी निवेदन देऊन चौकशी करावी अशी मागणी केली आहे.यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष शितल चव्हाण, युवा संघटक बाबा वाघमारे, सहसचिव सोमनाथ नागटिळक, भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार विभाग प्रमुख विजय बनसोडे, बाळासाहेब कदम, उस्मानाबाद शहर उपाध्यक्ष बप्पा शिंदे, मिलिंद खुणे कळंब तालुका महासचिव मनिष कांबळे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या