पुणे जिल्हा प्रतिनिधी (अजिंक्य मस्के)*
आधुनिक काळात मानवाच्या नीतिमूल्यातील घसरणीमुळे आणि वाढत्या औद्योगिक विकासामुळे स्त्रीची अशा वंदनीय अवस्थेतून दयनीय रूपात परिवर्तन झालेले दिसते. ह्याला पुरावा म्हणजे दररोज नित्य नवनवीन प्रकारचे होणारे स्त्री अत्याचार. ह्याशिवाय ज्या कुटुंबात अथवा घरात ती स्वत:ला सुरक्षित समजते त्याच तिच्या घरात ती कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडते आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की,यशोदा हरी गायकवाड (वय19) राहणार आळंद तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा केशव सुरेश बिजवे (वय 21) समर्थ नगर वैदुवाडी हडपसर या दोघांचे लग्न होऊन 4 महिने झाले असताना सासू -सासरे- जाऊ मिळून गेले दोन महिन्यापासून पीडित महिलेस गरोदर असताना मानसिक छळ करत होते पण त्या पीडित महिलेला कोणाशी संपर्क करता येत नव्हता तरी ती तशीच सहन करत राहत होती घरातील सर्व कामे आटपून काल दुपारच्या सुमारास की झोपी गेली असता जाऊ या पीडित महिलेच्या अंगावर बदलीभर पाणी ओतून सासरे – सासू यांनी लोखंडी पाईप ने पायावर मार हान केली असताना जीवे मारण्याची धमकी दिली… या पीडित महिलेने तिथे पळ काढून दलित पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांच्याशी संपर्क साधला या घटनेची सखोल चौकशी करून त्वरित पीडित महिलेला पोलीस स्टेशन मध्ये लिहून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्या महिलेसोबत होणाऱ्या मानसिक व महाराणीबद्दल चर्चा केली व पीडित महिलेची तक्रार नोंद करून 4 लोकांवर गुन्हा दाखल आला…
दलित पॅंथर संघटनेचे महा.युवक अध्यक्ष बंडू गवळी सातारा जिल्हाध्यक्ष अमोल पवार जॅक्सन पानेम पीडित महिलेला न्याय मिळवण्यासाठी मदत केले व त्या पीडित महिलेला त्यांच्या आई वडिलांकडे सोपवण्यात आले.यावेळी पीडित महिला व त्यांचे आई-वडील दलित पॅंथर संघटनेचे व यशवंत भाऊ नडगम यांचे आभार व्यक्त केले.