पुणे(अजिंक्य मस्के ): कालकथित पद्मश्री नामदेव ढसाळ यांची 75वी अमृत महोत्सवी जयंती दलित पँथरच्या वतीने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून व नामदेव दादांच्या फोटोस हार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सचिन पलांडे (कोकण प्रांत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) शंकर दादा तडाके (क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनाचे संस्थापक अध्यक्ष)अँड भूपेंद्र दादा गोसावी (उपाध्यक्ष पुणे जिल्हा वकील संघटना, विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन) हरिदास नागनाथ घोडके (लिपिक टंकलेखक प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे आरटीओ) शहानाज बागवान (पथारी अध्यक्ष मनपा) विजय गोविंद जरे (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष पिंपरी चिंचवड अध्यक्ष तथा युवा उद्योजक) श्याम भाऊ गायकवाड (भीमछावा संघटना संस्थापक अध्यक्ष) अशा अनेक मान्यवर विद्रोही कवी साहित्य उपस्थित होते
या 75 व्या अमृत महोत्सवी जयंती निमित्त सामाजिक शैक्षणिक राजकीय वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यास दलित पॅंथर चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम व मान्यवरांच्या हस्ते 75 पँथररत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शंकर भाऊ तडाखे यांनी मनोगत व्यक्त करताना मागील काळातील आठवणींना उजाळा दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक जागरूकता निर्माण झाली. अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देत नामदेव ढसाळ हे व्यक्तिमत्व उदयास आले.
त्यानंतर
दलित पॅंथरची राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांनी आपल्या विद्रोही शब्दात आपली मांडणी व्यक्त केली
नामदेव ढसाळ म्हटलं की समोर येतो तो फ्रेंच कट असलेल्या माणसाचा हसरा चेहरा आणि रंगबिरंगी शर्ट. हे जरी दर्शनी रूप असलं तरी या माणसाची खरी ओळख काय या गूढाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे.
जसा प्रश्न नामदेव दादा ढसाळांनी आपल्या कवितेतून विचारला, ‘तुही यत्ता कंची, तुही यत्ता?’ असाच प्रश्न मला स्वतःला अनेकदा विचारावा वाटतो. ‘तुला कंचा नामदेव जास्त आवडतो साहित्यिक की चळवळीतला, कंचा नामदेव?’
असाच प्रश्न त्यांच्या चाहत्यांना सातत्यानं पडला आहे म्हणून वाटलं की आज आपणही आपल्या परीने याचा शोध घेऊया.
नामदेव दादा ढसाळ कवी आहेत की दलित चळवळीचे नेते म्हणजेच ‘पँथर’ आहेत की या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याचा शोध अनेकांनी यथाशक्ती घेण्याचा प्रयत्न केला. पण दादा स्वतः संवाद कार्यक्रमात राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत सांगतात की ‘माझ्याजवळ हे द्वैतच नाही. कविता करणं ही माझी राजकीय कृतीच आहे. तर चळवळीतले काम करताना देखील कविता माझ्या मनात कुठे ना कुठे सुरूच असते. मंडपासाठी खांब रोवताना सुद्धा माझ्या डोक्यात कविता सुरू असू शकते.’
नामदेव दादा ढसाळ म्हणत असत की ‘मला अशी एक कविता करायची आहे जी वाचल्यावर ती व्यक्ती 24 तास फक्त त्याच विचारात राहील’. पण त्यांनी अशी एकच नाही तर शेकडो कविता केल्या आहेत ज्या वाचल्यावर अनेक दिवस त्या कविता तुमच्या मेंदूत घर करून बसतात.
ज्या व्यवस्थेविरोधात नामदेव दादा ढसाळांनी एल्गार पुकारला होता त्याच व्यवस्थेनं पुरवलेल्या ऐवजांवर आपला पिंड पोसला असल्याची जाणीव ते निदान एकदा तरी तुम्हाला करुन दिल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत.
‘जात व्यवस्था-वर्ग व्यवस्था तोडण्याचं काम हे केवळ एकट्या दुकट्या जातीनं एकत्र येऊन होणार नाही. त्यासाठी सर्व समाजानंच एकत्र येऊन हे बंधन झुगारायला हवं, हा उद्देश घेऊनच त्यांनी कविताही लिहिली आणि चळवळीचं कार्यही केलं. आपण पण तेच केलं पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे
नामदेव ढसाळ जर आज असते तर त्यांनी आज 76 वर्षांत पदार्पण केलं असतं. त्यांच्या निधनाला 11 वर्ष झाली. ते असताना आणि नंतर देखील जागतिक स्तरावर मराठी कविता पोहचवणारा अशीच त्यांची ख्याती होती
2001 साली बर्लिन आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव गाजवणं असो किंवा अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ काँग्रेससाठी त्यांच्या साहित्याची निवड असो, यातून त्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व स्पष्ट होतं. साहित्यामुळं जग हादरवता येतं की नाही यावर वाद असू शकतात, पण नामदेव ढसाळ वाचलेल्यांचं सांस्कृतिक जग त्यांनी नक्कीच हादरवून सोडलं.
नामदेव दादा ढसाळ 64 वर्षांचं आयुष्य जगले. जे त्यांनी पाहिलं जगलं तेच त्यांनी लिहिलं आणि त्यांनी जे लिहिलं ते जगले. अशी व्यक्ती सापडणं खरंच दुर्मीळ असतं.
जरी नामदेव ढसाळांनी त्यांच्या आयुष्याचा पट सर्वांसमोर खुलेपणानं मांडला असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातलं गूढ काही केल्या संपत नाही हे देखील तितकंच खरं आहे. त्यांच्या साहित्याबद्दल, त्यांच्या चळवळीतील कार्याबद्दल, त्यांच्या चित्रकलेबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आधीची पिढी आकर्षित झालीच आहे पण येणाऱ्या पिढ्या देखील होतच राहतील यात शंका नाही. आणि दलित पंचायत संघटनेच्या माध्यमातून आपण गोरगरीब वंचित पिढी त शोषित लोकांना न्याय देण्याचं काम आत्तापर्यंत केलेलेच आहे यापुढेही करत राहू अशी स्पष्ट भूमिका यशवंत भाऊ नडगम यांनी मांडली व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांच्या आभार व्यक्त केले..
यावेळी दलित पॅंथर संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..