spot_img
spot_img
spot_img

संजयगांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्याची लुट थांबवावी

 

तहसिल कार्यालयतील दलालांच्या बदोबस्त करण्याची लाभार्थ्याकडून होत आहे मागणी

– – – – – – – – – – – – – – – – – –

जळकोट (अरुण लोखंडे ) महाराष्ट्र राज्य सरकारने गोर गरीब वंचीत घटकातील वयोवृध्द निराधार महिला पुरुष यांना संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजने अंतर्गत प्रतिमहीना हजार बाराशे रुपये मानधन चालू केलेले आहे . मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची काही दलाल लुट करित असल्याचे परिसरात चर्चा होत आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्यातील निराधार विधवा महिला वयोवृद्ध मंडळी यांच्या साठी त्यांना त्याचे जीवन चालविण्यासाठी सदर लोकांना त्यांच्या वयाच्या मानाने कामधंदा होत नसल्याने शासनाने अशा गरजू लोकांना आर्थिक साहय करण्याकामी अंत्यंत प्रभावी योजना राबविली आहे आणि त्यांचा फायदा अनेकांना होत असताना दिसत आहे ही मंडळी महिन्याला येणाऱ्या त्या पगारीवर अगदी आनंदाने आपल्या वृद्धकाळातील आयुष्य जगत असताना दिसत आहे

मात्र दुसरीकडे ही योजना पदरात पाडून घेण्यासाठी शासानाने ज्या काही नियम अटी लागू केले त्या सर्व कागदपत्राची पूर्तता करण्या कामी तहसील कार्यालया मध्ये जावून शपथपत्र सादर करावे लागते . त्या कामासाठी ग्रामीण भागातील काही लोकांना या कामी जळकोट आणि परिसरात काही खास दलालाची टोळी सक्रीय झाली आहे त्यात खास करून तुळजापूर तालुक्यातील समगरा मड्डी येतील दलाल हा या भागामध्ये थैमान घातल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे . जळकोट येथील काही लाभार्थी महिलाची आमचे प्रतिनिधी यांनी भेट घेतली असता त्यामध्ये एक निराधार आहे दुसरी वयोवृद्ध आहे त्यांना विचारणा केली असता सदरची पगार चालू करण्यासाठी या लाभार्थी महिलाकडून सहा हजार दुसरीकडून सहा हजार पाचशे रुपये अशी रक्कम घेतली पण पगार काही चालू झाली नाही शेवटी जळकोट गावातील सामाजीक कार्यकर्ते यांच्याही ही बाब लक्षात आत्यानंतर त्यांनी एकोनीस गरजू जे सदर योजनेत पात्र होतात अस्या लोकांची लागणारी कागदपत्रे घेवून त्यांची रितसर पुरतता करून त्यांना मंजुरीचे पत्र आणुन दिले असता काही महिला भावनिक होवून कशी आमुची लूट झाली ते सागू लागले . पैशे ते घेतला पण काम ही केला नाही एवढे पैशे का लागतात अशी विचारणा सलगरा (मडी ) येतील दलालास या महीला विचारल्या असता आम्हाला तहसील मधील साहेब लोकांना दयावे लागतात पैशे दिल्याशिवाय पगार मंजुर होत नाही म्हणुन या दलालानी अनेक गोर गरीब महिला पुरुषांकडून पैश्याची लूट केलेली आहे सदर दलालास तहसील कार्यालयात कोण पोसतय किव्हा गावपातळीवर कोणता पुढारी याला मदत करातोय यांचा शोध घेवून ह्या दलालाचा बंदोबस्त करून गोर गरीबाची लूट थांबवावी व मा तहसिलदार साहेबानी अश्या दलालावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरीकांतून होत आहे

Related Articles

ताज्या बातम्या