धाराशिव प्रतिनिधी : धाराशिव शहरातील मोठ्या प्रमाणात गोवंशाच्या रक्ताचे वाहणारे पाट थांबवावेत आणि आई तुळजाभवानीच पवित्र प्रशासनाने राखावे . खिरणी नव्याने तयार झालेल्या बेकायदेशीर कत्तलखाने व पिंपरी गावातील बेकायदेशीर कत्तलखाने, हाडांची कारखाने तातडीने उध्वस्त करण्यात यावेत . म्हणून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना महाराष्ट्र शासनाचे मानद पशु कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी गोरक्षक दिनेश धनके यांनी निवेदन देऊन तक्रार दाखल केले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी, सकारात्मक चर्चा झाली . लवकरच योग्य कारवाई करू, असे आश्वासन दोन्ही अधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती दिनेश धनक यांनी सांगितले