spot_img
spot_img
spot_img

आम्हाला पण माणसासारखे, स्वाभिमानाने जगू द्या….

पुणे जिल्हा प्रतिनिधी (अजिंक्य मस्के) :- हे ‘फास’ सुटणार कधी? अंधश्रद्धा, अज्ञान यामुळे निर्माण होणारे प्रश्‍न; तसेच समाजातील महिलांना मिळणारी अमानवी वागणूक अशा विचित्र परिस्थितीत पारधी समाज वाटचाल करत आहे.

 

शिक्षण आणि रोजगारापासून कोसो दूर असणाऱ्या या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावयाचे असेल, तर त्यांच्या समस्या जवळून अनुभवत त्याची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

अशी खंत श्री साई एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री.सागर शेडगे सर यांनी व्यक्त केली व आज त्यांच्या तांड्याला भेट दिली. तेथील समस्या त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना जगण्याची एक नवी उमेद त्यांच्या मनामध्ये निर्माण केली.

तेथील लहान मुला मुलींची 1 ली ते 12 वी पर्यंत शिक्षणाची व नोकरीची जबाबदारी त्यांनी घेतली. व जे काही आपल्या संस्थेकडून व सरकारकडून मिळणाऱ्या ज्या काही योजना असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.

या कार्यक्रमासाठी श्री. संजय कांबळे सर रोलर स्केटिंग महाराष्ट्र अध्यक्ष, श्री. अमोल पवार दलित पँथर सातारा जिल्हाध्यक्ष, सचिन शिंदे सर, शफिक शेख सर यांनी देखील या समाजासाठी पुढे येऊन काम करण्याची गरज आहे असे सांगितले.

फासेपारधी समाजाचे श्री. कोंडके शिंदे, श्री. बाबू पवार, सौ. अश्विनीताई पवार यांनी सागर सरांनी जे काही त्यांच्यासाठी व त्यांच्या समाजासाठी प्रयत्न केले त्याबद्दल त्यांच्या समाजाकडून सरांचे अभिनंदन केले.

Related Articles

ताज्या बातम्या