मुख्य बाजारपेठेत चिखलाचा राडा नागरीकांना करावी लागत आहे कसरत .
या कामी ग्रामपंचायत लक्ष घालेल का ?
जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे अवेळी पडलेल्या पावसामुळे संपूर्ण गावातील रस्ते खराब झाले असून मुख्य बाजारपेठेतील चौकात चिखलाचा राडा झाला असून नागरीकंची खूपच गैरसोय होत आहे .
याबाबत प्राप्त माहिती अशी की गेल्या पाच ते सहा दिवस वळीवाच्या पावसाने जळळोट आणि परिसरात कहर केला असून या पावसामुळे जळकोट गावातील अर्तगत रस्ते हर घर मे जल योजनेच्या कामानिमित्त पक्के रस्ते फोडल्याने संपूर्णपणे रस्ते चिखलमय झाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे . गावातील गटारी तुंबल्याने दुरगंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढले आहे . यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरील माजी सरपंच यांच्या घरापासून ते मुख्य बाजारपेठ छत्रपत्ती शिवाजी चौक परिसरात चिखलच चिखल होऊन नुसती चिखलाची रबडी झाली असुन निसरंडा झाला असून नागरीका सह अबाल वृद्धाना पायी चालत जात असताना चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल आहे हे समजत नाही . अनखी पावसाळा चालू व्हायचा आहे तरी सदया गावात ही परिस्थिती आहे पावसाळा चालू झाला की ‘ मग तर विचारायलाच नको अशी स्थित्ती निर्माण होईल सांगता येणार नाही .
जळकोटचा शनिवारी आठवडी बाजार भरत असतो बाजार परिसरात पण पाण्याचा व्यवस्थितपणे पाण्याचा निचरा होत नसल्याने त्या ठिकाणी व्यापाऱ्याना चिखल बाजुला सारून भाजीपाला घेवून बसण्याची वेळ आली आहे मग पाऊस पडला की संपूर्ण भाजीपाल्यामध्ये पाणी शिरते नाविलाजाने ग्राहकांना तो माल घ्यावा लागत असून व्यापाऱ्यासह बाजारकरूना याचा नाहाक त्रास होत आहे पावसाळया पूर्वी संमधीत ग्रामपंचायत ने ज्या ज्या भागात रस्त्यावर पाणी साचले आहे त्याचा निचरा करून रस्ते गटारी व्यवस्थित करावी ही अशी मागणी सुजान नागरीकांतून होत आहे .