वागदरी ( एस.के. गायकवाड ):
तुळजापूर तालूक्यातील बोळेगाव येथिल ग्राम पंचायतीच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी सरपंच विलास पाटील, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश सुर्यवंशी,सोसायटीचे चेअरमन दादाराव काळे,भाजपा नेते अंगद जाधव आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिचे पुजन करून सरपंच विलास पाटील यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहन करून मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रा प.सदस्य सुनिल सुर्यवंशी, पवन सुर्यवंशी, पोलीस पाटील कडाजी सुर्यवंशी, दत्तात्र्य साळूंके, पप्पु चव्हाण, महादेव काळे, लक्ष्मण रुपनुर,पंडित भोसले, दत्ता बनसोडे,सामाजिक कार्यकर्त्या संगीता सुरवसे सह ग्रामस्थ,महिला, युवा कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.