अणदूर प्रतिनिधी: वटपौर्णिमेला आजकाल वडाच्या झाडाच्या फांद्या घरातून त्यांची पूजा करण्याची पद्धत रूढ झाली आहे. मात्र यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. या पद्धतीला छेद देत या सणाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाची साद घालण्याचे काम अणदूर मधील काही युवकांनी केले. धनगरगल्ली येथे वडाच्या झाडाची लागवड करून त्यांनी विधिवत पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली.
वटपौर्णिमेला आजकाल वडाच्या झाडाच्या फांद्या घरातून त्यांची पूजा करण्याची पद्धत रूढ झाली आहे.
आजच्या आधुनिक युगात खरेतर अनेक महिला वटपौर्णिमा वेगवेगळ्या प्रकारे साजरी करतात. मात्र यामध्ये खरा उद्देश साध्य होतोच, असे नाही. त्यामुळे पर्यावरणपूरक असा हा एक नवीन पायंडा पाडण्याण्यासाठी या युवकांनी महिलांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.
वर्षानुवर्षे वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी पुराणातील सत्यवान-सावित्री कथेचा आधार घेतला जातो. निसर्गचक्रातील एक महत्त्वाचा वृक्ष असणाऱ्या वडाच्या सान्निध्यात वर्षभरातून किमान एकदा तरी महिलांनी यावे, वटवृक्षाकडून मोठ्या प्रमाणात मिळणारा प्राणवायू ग्रहण करावा, या हेतूने खरेतर वटपौर्णिमेची प्रथा पडली. मात्र आधुनिक काळात हा मूळ अर्थ लोप पावत चालला आहे, असे या महिलांनी सांगितले.
यावेळी हा उपक्रम राबविण्यासाठी रोहन दुधाळकर व राहुल घोडके यांनी पुढाकार घेतला..हा कार्यक्रम राबविण्यासाठी वसंत गुड राजेंद्र एडके परमेश्वर घोडके राकेश दुधाळकर रवींद्र एडके ओम भालेकर सोनू मातोळकर आधी समाज बांधव उपस्थित होते.