कळंब, [आज दिनांक ९ नोव्हें, २०२५]
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षा डॉ. सरोजनीताई संतोष राऊत यांनी गेल्या ७ ते ८ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या सामाजिक कार्याचा वसा कायम ठेवत, आपल्या राजकीय वाटचालीस एक वेगळी दिशा दिली आहे. जनसेवेच्या माध्यमातून त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे.
सामाजिक कार्याची पार्श्वभूमी :
डॉ. सरोजनीताई राऊत या केवळ पदधिकारी नाहीत, तर त्याआधीपासूनच सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. गेल्या सुमारे आठ वर्षांपासून त्यांनी कळंब तालुक्यात विशेषतः कार्यतत्पतेने आरोग्य शिबिरे, महिला सक्षमीकरण कार्यक्रम आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत अशा विविध उपक्रमांद्वारे नागरिकांशी थेट संपर्क प्रस्थापित केला आहे. त्यांच्या या जनसंपर्कामुळेच त्यांना जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी नागरिकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.
राजकीय महत्त्वाकांक्षा आणि विधान सभा :

सामाजिक कामातील त्यांची सक्रियता आणि जनमाणसातील त्यांची प्रतिमा, या पार्श्वभूमीवर त्यांनी गेल्या विधान सभेच्या निवडणुकीतही उमेदवारीसाठी तयारी दर्शवली होती. “पक्ष नेतृत्वाने त्यांच्या कामाची दखल घेतली होती आणि उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चा होती”. जरी त्या निवडणुकीत त्यांना संधी मिळाली नसली, तरी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा आणि तयारी दिसून आली.
सध्याचे कार्य आणि पुढील वाटचाल :

सध्या जिल्हा उपाध्यक्षा म्हणून त्या पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करत आहेत. नायगाव गटातील विकासकामांवर त्यांचा विशेष भर आहे.
डॉ. राऊत यांच्या या प्रवासातून हे स्पष्ट होते की, समाजकारण आणि राजकारण यांची सांगड घालून त्या जिल्ह्यात आपला राजकीय प्रभाव वाढवत आहेत. आगामी काळात पक्षाकडून त्यांना कोणती मोठी जबाबदारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.






