spot_img
spot_img
spot_img

जळकोट येथे शिवशंभू सोशल फाउंडेशन च्या वतीने व्याख्याते गणेश शिंदे यांचे व्याख्यान 

आवाज महाराष्ट्र न्युज रिपोर्टर :विजय पिसे जळकोट:तूळजापूर तालुक्यातील जळकोट येथील शिवशंभू सोशल फाउंडेशन च्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जळकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. गणेश आत्माराम शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात व्याख्याते गणेश शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून व राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा शिवशंभू सोशल फाउंडेशनच्या श्रीनिवास पाटील, रोहित शिंदे, विश्वास भोगे, सुदर्शन पवार, ओंकार कदम, ओंकार इगवे, प्रसाद हतै, महेश कदम, अजय गंगणे, सुशांत गंगणे, सागर करंडे, सलीम तांबोळी, अनिरुद्ध कदम यांच्या हस्ते विजयकुमार मोरे, डी.डी. कदम , भालचंद्र पोद्दार सर या मान्यवरांचा व गावातील सामाजिक कार्यात कार्य करत असलेल्या व्यक्तींचा शाल ,फेटा, पुष्पहार व झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश आत्माराम शिंदे यांनी “जीवन सुंदर आहे” या विषयावर आपल्या मधुर वाणीतून उपस्थितांना जीवन खूप सुंदर आहे यामध्ये जीवनात येऊन आपण आपली नाती जपली पाहिजेत. माणसाने निसर्गावर प्रेम करा जीवन सुखमय जगता येईल हे समजावून सांगितले. या कार्यक्रमास जळकोट गावचे सरपंच गजेंद्र कदम, माजी सरपंच अशोकभाऊ कदम, मा. जी. परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, शिवसेना नेते कृष्णात मोरे, राष्ट्रवादीचे महेश कदम, बबन मोरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल छत्रे, हेमंत पाठक, राजकुमार पाटील, पंढरीनाथ कदम, हे होते. या कार्यक्रमाची सांगता सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी स्वतः लिहिलेल्या “काय सांगू राणी मला गाव सुटेना”या गाण्याने करण्यात आली. या कार्यक्रमाचे निवेदक सोलापूर जिल्ह्यातील भारत दादा मुढे हे होते. या कार्यक्रमास गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related Articles

ताज्या बातम्या