पुणे जिल्हा प्रतिनिधी ( अजिंक्य मस्के) : काही नाव सोडली तर सगळ्यात राजकारण्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वाटोळे केलं मात्र कीर्तनकार कलाकार साहित्यकांनी ही संस्कृती जपली आहे त्यांचे आभार मानावे लागेल पूर्वीचे राजकारण हे राष्ट्रहिताचे होते मात्र सध्याचे राजकारणी हे स्वार्थ साधण्यासाठी राष्ट्राचा देखील बाजार करायला मागेपुढे बघत नाहीत असे परखड मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
जनहित पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व श्री साई एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तुत्वान व्यक्तींचा गौरव सोहळा आज रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी पत्रकार भवन येथे संपन्न झाला ज्येष्ठ साहित्यिक परखड वक्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे 75 दिव्यांनी औक्षण करून शाल पुष्पहार विठ्ठल रुक्माई चे प्रतिमा भेट देऊन सह पत्नी विशेष सत्कार करण्यात आला.
सदर सोहळ्याप्रसंगी कीर्तन केशर ह भ प चंद्रकांत महाराज वांजळे प्रसिद्ध गायक अभंग रचनाकार पंडित यादवराज फड श्री साई एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सागर शेडगे सर दलित पॅंथर चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम कार्यक्रमाचे आयोजक अमोल पवार, रविराज डेरीचे रवींद्र सारूक, सोपान वांजळे, दिलीप चोरगे, गिरीश खत्री, संजय कांबळे सर , बंडू गवळी दलित पॅंथर सोलापूर जिल्हा अध्यक्ष यांच्यासह विविध मान्यवर पुरस्कारार्थी संस्थेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत अमोल पवार यांनी केले सूत्रसंचालन दत्ता कडू सर यांनी तर विजय मराठे सर यांनी आभार मानले