spot_img
spot_img
spot_img

तुळजापूर तालुक्यात पवनचक्की माफीयाची दादागिरी

शेतकरी जुलमी संकटात

दलाल मात्र जोमात

नदगाव प्रतिनिधि (शाम नागिले ) तुळजापूर तालुक्यातील मौजे गंधोरा गावातील शेतकऱ्यांना पवनचक्की वाल्याकडून दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे .

याबाबत प्राप्त माहीत अशी की सध्या धाराशिव जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात पवनचक्कीचे काम जोरात चालू आहे पण मात्र या कामकरिता शेतकऱ्याच्या शेतीचे आतोनात नुकसान झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे . त्यात सद्या तुळजापूर तालुक्यातील मानमोडी, मानेवाडी,देवसिंगा,गंधोरा आदि भागामध्ये पवनचक्की बसविण्याचे काम अति प्रमाणात होत असतानाचे चित्र पहावयास मिळत आहे .

गंधोरा येथील खेलू सोनटके यांच्या व हिराचंद सोनटके याची गट .नं २८६ मध्ये शेती असून सदर शेतकऱ्यांना जमीनीचा मोबदला देतो म्हणुन काम चालू करून सदर शेतकऱ्यांचा शेतातून सदर कामाचे सामान ने आण करण्यासाठी वाहनाचा वापर करण्यात आला सदरची वाहने ही संमधीत शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून घालून पिकांचे नुकसान करण्यात आले पण त्याबरोबर जमीनीचे ही आतोनात नुकसान करण्यात आले आहे जेव्हा हे गरीब अल्पभुधारक शेतकरी सदरच्या झालेल्या शेती जमीनीचे व पिकांचे नुकसान झालेल्या संदर्भात मोबदला मागितला असता शेतकऱ्याना दमदाटी करणे,तुमचा मोबदला देणार नाही,तुम्हाला काय करायाचे ते करा म्हणुन सुरक्षा रक्षका मार्फत त्याना दम देण्यात येत आहे त्या सुरक्षा रक्षकाकडे असलेल्या बदुकीचा धाक दाखविणे असा प्रकार सध्या गंधोरा परिसरातील शेतकऱ्याच्या बाबतीत घडत असल्याचे पाहावयास मिळत आहे तर याच गावातील अल्पभुधारक शेतकरी श्रीमती त्रिवेणी सोनटक्के यांच्या शेतातून सबस्टेशनचे काम चालू असताना त्यांच्या शेतजमीनी मधून वाहन जावून जावून शेतात मोठ माठे खड्डे पडले असून सदरची शेतजमीन ही नापीक झाली असुन या शेतकऱ्यांना उपासमारीचे दिवस आले असून यांच्यावर अन्याय होताना दिसत आहे . भारत हा कृषी प्रधान देश आहे म्हणुन संपूर्ण जगाला देशाची ओळख आहे एकीकडे केद्रशासन व महाराष्ट्र शासन शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबविल्या आहेत . त्यांचा अनेक शेतकरी फायदाही घेत आहेत मात्र दुसरीकडे काही शेतकऱ्यांच्या बाबतीत अन्याय ही होत आहे शेतकरी आहे म्हणुन आपण आहोत तो आपला अन्नदाता आहे तो जागचा पोशिंदा आहे मात्र या जगाच्या पोशिंदयाला जर काही दलाल व पवनचक्की वाले धमकी देत असतील तर या देशातील शेतकरी सुरक्षित आहे हा का? प्रश्न सदया पडला आहे .

गंधोरा येथील शेतकरी हा त्याला न्याय मिळवा म्हणुन मा जिल्हाधिकारी साहेब यांना सदरच्या प्रकरणी न्याय मिळावा व माझ्या झालेल्या जमीनीचे नुकसान भरपाई मिळावी याकामी निवेदन दिले असून योग्य न्याय नाही मिळाला तर मला आत्महत्या शिवाय पर्याय नाही असे तो म्हणाला या पवनचक्की कंपनीचा व दलालांचा बंदोबस्त करून संबंधित शेतकऱ्यांना त्याचा मोबदला व न्याय मिळावा म्हणून शेतकऱ्यातुन मागणी होत आहे

Related Articles

ताज्या बातम्या